
या संशोधनात 2026-27 च्या Union Budget मुळे भारताच्या कृषी क्षेत्रावर झालेले परिणाम अभ्यासले आहेत. कृषी व संबंधित क्षेत्रांसाठी करण्यात आलेली निधी तरतूद, शेतकरी सहाय्य योजना, पिक विमा संरक्षण, कर्ज सुविधा व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यांचा शेतकऱ्यांच्या उत्पन्न, उत्पादन क्षमता व जोखीम व्यवस्थापनावर कसा परिणाम झाला याचे विश्लेषण करण्यात आले आहे. या अभ्यासातून असे दिसून येते की अर्थसंकल्पातील तरतुदींमुळे कृषी क्षेत्राच्या दीर्घकालीन विकासास चालना मिळण्याची शक्यता आहे; मात्र काही मर्यादा व आव्हानेही कायम आहेत.
